Posts

एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण - अरुण बोऱ्हाडे

Image
  एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण  © अरुण बोऱ्हाडे  दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी सुरु झालेले घंटानाद आंदोलन हळुहळू वाढत गेले. गेले बारा-तेरा दिवस नित्यनेमाने सकाळी, दुपारी आणि सायंकाळी शिफ्टड्युटीप्रमाणे कामगार सहकारी आंदोलन मंडपात येत. सकाळी कंपनी सुरु होण्यापूर्वी काहीवेळ, पुन्हा दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि सायंकाळी ४.३० वाजता कंपनीची सर्वसाधारण पाळी सुटल्यानंतर सहा- साडेसहा वाजेपर्यंत सर्वजण घंटानाद करून धरणे मंडपात बसायचे. वृत्तपत्रांतून दररोज येणाऱ्या बातम्या वाचून शहरातील विविध कारखान्यांतील कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार गटागटाने आंदोलनस्थळी येवून आंम्हाला पाठिंबा जाहीर करीत होते. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांचेही पदाधिकारी येवून पाठिंबा म्हणून आमच्या धरणे आंदोलनात आमच्यासह बसत होते. दररोज कोणीतरी पाठिंबा देणारी भाषणे करायचे. विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी येवून कामगारांच्या मुलाखती घेत, त्यावेळी आजच्या इतके इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्या नव्हत्या आणि पत्रकार प्रत्यक्षात जावून बातम्या करीत असत. पोलिस...

एच. ए. कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे! (१) [लेखक - अरुण बोऱ्हाडे]

Image
एच. ए. कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे! (१)  © अरुण बोऱ्हाडे 🌿 आज १ नोव्हेंबर, बरोबर वीस वर्षे झाली, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीच्या बंद प्रक्रियेविरोधात आम्ही कामगारांचा लढा उभा केला होता. घंटानाद, धरणे  आंदोलन, मानवी साखळी, पथनाट्ये, मोर्चा, उपोषण अशा विविध पद्धतीने, मात्र काम चालू ठेऊन शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन सुरू केले होते. जवळजवळ एक महिन्याचा आमचा कार्यक्रम निश्चित ठरविलेला होता. त्याप्रमाणे पूर्णही केला, त्याहीपुढे जाऊन संभाव्य खाजगीकरणास विरोध दर्शवित पंचेचाळीस दिवस हा घंटानाद चालू होता. कुठेही हिंसक वळण लागणार नाही, याची पुरेपूर दखल घेण्यात आली होती. या आंदोलनात सर्व कामगार बंधू भगिनींचा सहभाग होता. व्यवस्थापनानेही पाठिंबा दिला होता. प्रश्न प्रत्येकाच्या भवितव्याचा होता. त्यामुळे कामगार अधिकारी एकाच छताखाली लढत होते. हळुहळू पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक कामगार संघटना, सामाजिक संस्थांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला होता. साहजिकच आमचे सर्वांचे मनोधैर्य वाढत होते. विशेषतः त्याकाळातील सर्व वृत्तपत्रांनी खूप चांगले सहकार...

हिरव्या बोलीतील कवी पद्मश्री ना. धों. महानोर [लेखक © अरुण बोऱ्हाडे]

Image
अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत : हिरव्या बोलीतील कवी पद्मश्री ना. धों. महानोर लेखक © अरुण बोऱ्हाडे 🌿 आज सकाळी कविवर्य ना. धों. महानोर गेल्याची बातमी वाचली अन् मनात धस्स झाले. नुकतेच माझे "अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत" हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामधे मी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही व्यक्तिरेखा शब्दबद्ध केल्या आहेत. ज्यांच्या काव्यातील मधाळ, हिरव्या, रसरशीत आणि लडिवाळ शब्दांनी लहानपणापासून माझ्या मनावर अधिराज्य केले आहे, असे रानकवी ना. धों. महानोर या प्रज्ञावंताविषयी मी त्यामध्ये लिहिले आहे. हे पुस्तक त्यांना समक्ष भेटून द्यावे, असा माझा विचार होता. मध्यंतरी कळाले की त्यांची प्रकृती बिघडली आहे, इतक्यात भेटता येणार नाही. आता त्यांना बरे वाटल्यावर जाऊन भेटू, असे ठरविले होते. तथापि नियतीने मला ती संधी दिली नाही. महाराष्ट्रातील एका आगळ्या वेगळ्या प्रतिभेचा चिरंजीवी अक्षरझरा, शब्दफुलांशी, लतावेलींशी, काळ्या मातीशी, धनधान्याशी, समाजाच्या सुखदुःखाशी समरस झालेला रानफुलांत रमणारा प्रज्ञावंत कवी, मराठी साहित्यातील एक मानदंड आणि शेतीमातीशी एकरूप झालेला निगर्वी मोठा माणूस आज हरपला आहे....

कुठे हरवली शहरातील ती हरनामसिंहांची हिरवाई ! [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

Image
 कुठे हरवली शहरातील ती हरनामसिंहांची हिरवाई ! पुणे मुंबई रस्ता सोडून आपण नाशिकफाट्याकडे वळलो की जवळपास एक कि.मी.चा प्रवास एखाद्या दाट वनराईतून किंवा हिरव्यागार बोगद्यातून केल्यासारखे वाटत असे. हे हिरवेगार वैभव अनेकजणांना आजही आठवत असेल. अगदी अलीकडे दहाबारा वर्षांपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही हिरवीगार दाट झाडी आपल्याला सुखावत होती. सन १९८२ च्या ऑक्टोबरमध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. त्यावेळी भारतीय प्रशासन सेवेतील श्री हरनामसिंह नावाचे अधिकारी प्रशासक म्हणून नेमले गेले. एक धाडसी, करारी, सुजाण, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून अल्पावधीतच जनमानसांत त्यांनी आपली प्रतिमा सिद्ध केली. आता महानगरपालिकेला चाळीस वर्षे होऊन गेली. मात्र सुरुवातीच्या काळात श्री  हरनामसिंह यांनी राबविलेल्या अनेक पायाभूत योजना व प्रकल्प आजही मार्गदर्शक ठरतात. सध्याची मनपा भवनाची टोलेजंग आणि देखणी इमारत, निगडीतील आखीवरेखीव वाहतूकनगरी, दुर्गादेवी टेकडीवरील नियोजनबध्द वृक्षारोपण अशा अनेक गोष्टी त्यांच्या कर्तबगारीच्या खुणा आजही जपत आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळा आला की मला श्री...

पवनाकाठचा कर्मयोगी : पिंपरी चिंचवडचे भाग्यविधाते 'अण्णासाहेब मगर' (लेखक : अरुण बोऱ्हाडे )

Image
पवनाकाठचा कर्मयोगी : पिंपरी चिंचवडचे भाग्यविधाते ' अण्णासाहेब मगर'. (लेखक @ अरुण बोऱ्हाडे )   🌿 पिंपरी-चिंचवड शहराच्या उभारणीच्या पायाभूत कारकिर्दीतील प्रमुख शिल्पकार, पहिले नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब मगर यांचा आज दि.२५ जून स्मृतिदिन.  देशामध्ये "बेस्ट सिटी" म्हणून पुरस्कार मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ कै. अण्णासाहेबांनी रोविली.  कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अनेक मोठ-मोठे कारखाने आले, उद्योगधंदे आले. त्यामुळे परिसरात कामगार, रहिवासी यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत गरजाही वाढल्या. नागरिकांच्या मुलभूत नागरी सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी  तत्कालीन हवेली तालुक्याचे आमदार कै. अण्णासाहेब मगर यांनी या परिसरात नगरपालिका व्हावी म्हणून पाठपुरावा केला. देशाचे नेते  यशवंतराव चव्हाण साहेबांच्या औद्योगिकीकरणाच्या  प्रयत्नांना पुरेपूर साथ देताना, स्थानिक गावकरी, उद्योजक आणि सरकारमध्ये सुयोग्य समन्वय साधण्याची मौलिक कामगिरी त्यांनी कुशलतेने निभावली.  राज्य सरकारने  दि....

संवेदनशील मनाचे, सुसंस्कृत नेते : राजयोगी यशवंतराव चव्हाण [लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे]

Image
संवेदनशील मनाचे, सुसंस्कृत नेते : राजयोगी यशवंतराव चव्हाण   [लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे]✍ महाराष्ट्र राज्याने आजपावेतो दोन डझनाहून अधिक मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्या प्रत्येकाचा कार्यकाळ  अनुभवला आहे. परंतु जनसामान्यांच्या अंतःकरणात बिंबलेले आणि  दीर्घकाळ स्मरणात राहिलेले, त्यांच्या कर्तबगारीबाबत आवर्जून सांगता येईल अशी दोनचारच नांवे घेता येतील. त्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. आपल्या सर्वांगीण कर्तृत्वाने महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनही त्यांनी आढळस्थान निर्माण केले आहे. एक सुसंस्कृत, सौजन्यशील आणि दूरदृष्टीचे सामाजिक, राजकीय नेते म्हणूनही त्यांची सर्वदूर ख्याती आहे. आज १२ मार्च कै. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्मदिवस, म्हणून त्यांचे स्मरण करण्यासाठी या शब्दपाकळ्या इथे एकवटल्या आहेत. आजपासून बरोबर ११० वर्षांपूर्वी म्हणजे दि. १२ मार्च  १९१३ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या अगदी छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. बळवंतराव चव्हाण हे त्यांच्या वडिलांचे नांव, तर विठाई आईचे नांव. अत्यंत...

श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत [लेखक : अरुण बोऱ्हाडे]

Image
 श्री नागेश्वर महाराज भंडारा : भक्तिमार्गातील शक्ती स्त्रोत. @ लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे (मोशी) बापरे ! केवढी ती तयारी ! सहा-सात फुट खोल आणि अडीच-तीन फुट  रुंदीची मोठमोठी आखीव रेखीव आणि बांधीव अशी तीनचार चुलांगणे, त्यासाठी खास मागविलेली लाकूडफोड, पंचावन्न - साठ पोती बेसनपीठ, तेवढेच तेलाचे डबे, तशीच साखरेची पोती, शंभरावर बटाट्याची पोती आणि बरेच काही साहित्य सामग्री, सोबतीला राबणारे असंख्य हात ! हा सारा सरंजाम कशासाठी हे कळालेच असेल ! प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा मोशीगावचा पावन पवित्र सोहळा, अर्थात श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव ! प्रतिवर्षी महाशिवरात्री आली की दुसऱ्या दिवशी येणाऱ्या भंडाऱ्याची चाहूल लागते. एकाचवेळी पाचशे-हजार नव्हे, तर सत्तर- पंचाहत्तर हजारांहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. श्री नागेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मोशीतील आमराईत हा पवित्र सोहळा मागिल सुमारे पावणेदोनशे वर्षांपासून अव्याहतपणे चाललेला आहे. पुणे नाशिक राज्य महामार्गावरील मोशी हे आमचे गांव. पुण्याहून जेमतेम वीस किलोमीटर अंतर. सर्वसाधारण गावाची रचना असते,...

श्रमशक्तिचा पाठीराखा : लोकनेते शरद पवार (लेखक - अरुण तुकाराम बोऱ्हाडे)

Image
  श्रमशक्तिचा पाठीराखा : लोकनेते शरद पवार @ अरुण तुकाराम बोऱ्हाडे  महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला चालना दिली. तसेच राज्यात एम.आय.डी.सी. ची निर्मिती करून रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी निर्माण केली. या उद्योगांना तंत्रज्ञ आणि कुशल कामगार उपलब्ध व्हावेत म्हणून प्रत्येक जिल्ह्यात आणि तालूक्यांत आय.टी.आय.चे जाळे ऊभे केले. कृषी-औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी केली. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना रोजगार निर्माण होतील, याची काळजी घेतली. हीच परंपरा पुढे घेऊन जाताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी बदलत्या काळाशी सुसंगत असे मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात आणले. संगणक युगाची गरज ओळखून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांचे जाळे विणले. शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नांनी लाखोंच्या संख्येने नवीन रोजगार निर्माण झाले.  मा. शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी घटकाला आपला वाटणारा, आश्वासक आणि आस्था असणारा नेता. समस्यांच्या खोलात जाणारा, सकारात्मक...

बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ देणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील - लेखक : अरुण बोऱ्हाडे

Image
बुद्धिमत्तेला ध्येयवादाची साथ देणारे कर्तबगार व्यक्तिमत्त्व : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील 🌿 "कोल्हापूरला शाळेत असतानाच माझी खरी जडणघडण झाली. नियमित व्यायामाने शरीरप्रकृती सुदृढ झाली आणि नियमित अभ्यासाने बुद्धिमत्ता विकसित  झाली. गणितासारख्या कठीण विषयात दोनशेपैकी १९८ गुण मिळाले, तरी शिक्षकांची बोलणी खाणारा मी विद्यार्थी आहे..." महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील शिक्षण क्षेत्रातील आभाळाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व डॉ. डी.वाय. दादा पाटील त्यांच्या जुन्या आठवणींना स्पर्श करीत शांतपणे आमच्याशी बोलत होते. माझे लहानपणीचे मित्र डॉ.अमरसिंह निकम यांच्या पिंपरीतील जुन्या हॉस्पिटलमध्ये स्वतः डी. वाय. दादा यांनी आवर्जून भेट दिली होती. त्यावेळी डॉ.अमरसिंह निकम, ज्ञानेश्वर वायकर आणि मी हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावरील डॉ. निकमांच्या घरात कॉफी घेत बसलो होतो.उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले दादा अतिशय शालीनतेने त्यांच्या जीवनातील काही पैलू उलगडून सांगत होते. त्या घरगुती मैफिलीत बोलता बोलता त्यांच्या समोरील कॉफी कधीच थंड झाली होती. साधारणपणे २००४-०५ मधील ही घटना असेल. केवळ  होमिओपॕथीचे उपचार करणारे ...