Posts

शिव-शंभू चरित्रासाठी आग्रही असलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण [लेखक - अरुण बोऱ्हाडे ]

Image
 शिव-शंभू चरित्रासाठी आग्रही असलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण       महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते कै.यशवंतराव चव्हाण हे इतर कोणत्याही राजकीय , सामाजिक नेत्यांपेक्षा खूपच वेगळे होते. सर्वसामान्यांविषयी असलेली कणव, त्यांच्या उत्कर्षासाठी शासनाच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना, ई.बी.सी. सवलत ही तर त्यांनी गरीब शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी दिलेली संजीवनी होती. त्याकाळी पैसा सहजतेने उपलब्ध होत नव्हता. खेडोपाडी शिक्षणाचा  अंधःकार होता. अशावेळी सामान्य माणसाला शिक्षणातून उभारी देण्याची गरज ओळखून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात माध्यमिक विद्यालये सुरू करविली. शेती, सिंचन, सहकारी साखर कारखाने याच्याबरोबर कृषीशाळा सुरू केल्या. औद्योगिक विकासाला चालना देताना औद्योगिक प्रशिक्षणाची सर्वदूर सोय करून याच मातीतून कुशल तंत्रज्ञ तयार केले. विकासाच्या कक्षा रुंदावताना शेती, उद्योग, धरणे, यापलिकडे जावून त्यांनी कला, क्रिडा, नाट्य, चित्रपट कलावंत, लोककलावंत यांनाही बळ देण्याची कामगिरी केली. स...

आठवणीतील प्रतिमा : ग्रामीण शब्दशैलीचा कथाकार, प्राचार्य रा. रं. बोराडे सर

आठवणीतील प्रतिमा :  ग्रामीण शब्दशैलीचा कथाकार, प्राचार्य रा. रं. बोराडे सर तीन चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव  पुरस्कारांतर्गत *जीवन गौरव पुरस्कार* प्रा. रा. रं. बोराडे सरांना जाहीर झाल्याचे समजले आणि त्यांच्या अभिनंदनासाठी मी त्यांना फोन केला. सरांनी फोन घेतला नाही आणि  पुन्हा फोन आला नाही. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मी, प्रसिद्ध गझलकार संतोष घुले आणि एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर जालना- औरंगाबादला (आताचे संभाजीनगर) एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. एखाद्या भागात गेल्यावर वेळ असेल तर आपल्या परिचित साहित्यिक किंवा कलाकार व्यक्तिला भेटावे, विचारपूस करावी अशी माझी सवय आहे. त्याप्रमाणे परतीच्या प्रवासात मी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे सर आणि डॉ. यु. म. पठाण सरांना फोन करून संभाजीनगरमध्ये भेटावयास गेलो. मी शाळेत असताना रा.रं. बोराडे यांची एक कथा आम्हांला अभ्यासाला होती. ग्रामीण शैलीतील ती कथा शिकविताना आमच्या सरांनी थेट लेखकाशी जवळीक करुन दिली होती. तेव्हापासून लेखक म्हणून बोराडे सर माझ्या मनात वास्तव्यास आहेत. पुढे योगाय...

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा... - अरुण बोऱ्हाडे

Image
  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा... पहाटे लवकर ऊठून एच.ए. वसाहतीतील विठ्ठल मंदिरात काकड आरतीसाठी जाताना, थंडगार हवेच्या झुळकींबरोबर आठवणींचे असंख्य तरंग मनात उमटत होते. माझ्या आयुष्यातील सुखाचे, आनंदाचे क्षण त्या तरंगावर अलगद उजळत होते. मंदिरापासून काहीशा अंतरावर असतानाच अभंगाचे सूर कानावर येवू लागले. मन आठवणींतून वास्तवाकडे धावले, मंदिराच्या भोवती सुरेख रांगोळी रेखिली होती. शिखरावर रंगीबेरंगी चिमुकल्या विद्युत दिव्यांची रोषणाई नयनांना सुखावत होती. टाळ पखवाजाचे बोल भाविकांच्या कंठातून येणाऱ्या शब्दसूरांशी मिसळत होते. विठ्ठल रुक्मिणीचे ते गोजिरे रुप मनाला सुखवित होते. श्वसन, श्रवन, नयन आणि भक्तिरसात चिंब झालेले मन जणू विश्वातील सारे सुखाचे क्षण माझ्यासाठी प्रसवत होते. कार्तिकस्नानानिमित्त नित्य होणारी काकडआरती ही काही नवीन गोष्ट नाही. कोजागिरी पौर्णिमेपासून प्रत्येक गावोगाव असलेल्या मंदिरात हे आरतीचे सूर उमटत असतात. आमच्या देहू आळंदी पंचक्रोशीत तर सर्वदूर गावांतील मुख्य मंदिरात आणि वाड्यावस्त्यांवर हे भजनाचे सूर ऐकू येत असतात. शेतकरी, गावकरी, भाविकजण या भक्तिरसात तल्लीन होत असतात. विठ्ठल...

भीमाशंकर -भोरगिरी भटकंती, आनंददायी, अवर्णनीय अनुपम - अरुण बोऱ्हाडे

Image
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने नुकतेच भीमाशंकर ते भोरगिरी या गिरीवन भटकंती मोहिमेचे आयोजन केले होते. पाच वर्षाच्या बालकापासून पासष्टीच्या ज्येष्ठांपर्यंत सुमारे तीसजण या भटकंती मोहिमेत सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणेच वेळेचे नियोजन आणि योग्य ती दक्षता, यामुळे ही मोहिम सुरक्षित आणि सुरळीतपणे यशस्वी झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री प्रविण हरपळे आणि पांडुरंग शिंदे यांनी उत्तम नियोजन केले होते. भल्या पहाटे ठरलेल्या वेळेत एकेकाला घेत गाडी वेळेवर निघाली. पेठच्या पठारावर सकाळची न्याहारी आटोपून मंचर बायपासने घोडेगाव, शिनोली, डिंभे मागे टाकून नागमोडी वळणे घेत गाडी भीमाशंकरच्या डोंगररांगा चढू लागली, तसा आसमंतात काळ्या- जांभळ्या मेघांनी स्वागताचा जणू मंडप ऊभारला. हवेतील गारव्याने आणि मातीतील गंधाने वातावरणात वेगळीच प्रसन्नता आणली. घनदाट हिरवाईतून जंगलाच्या पोटात जाणारा रस्ता जसजसा पुढे जात होता, तसतसा भीमाशंकरच्या गर्दीचा अंदाज येवू लागला. भीमाशंकरला देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने सुमारे दोन किलोमीटर अलिकडेच असंख्य गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी मेघराजाने बरसायला सुरुवात केली. रस्त...

यशवंतराव चव्हाण : इतिहासाचे चिरंतन पान © अरुण तुकाराम बोऱ्हाडे

Image
  यशवंतराव चव्हाण : इतिहासाचे चिरंतन पान © अरुण तुकाराम बोऱ्हाडे महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली. मी इयत्ता अकरावी मध्ये असताना मराठीच्या पुस्तकात "सोनहिरा" नावाचा एक धडा अभ्यासाला होता. सौ.कडूरकर मॕडम यांनी तो इतका तन्मयतेने शिकविला, की त्यातील व्यक्तिरेखा श्री. यशवंतराव चव्हाण आंम्हा विद्यार्थ्यांना अगदी घरातील व्यक्ती वाटू लागली. मी तर तेव्हापासूनच त्यांचा चाहता झालो. मॕडमकडून आणखी माहिती घेतली, शाळेच्या ग्रंथालयातून त्यांची पुस्तके मिळविली, वाचून काढली." यशवंतराव : इतिहासाचे एक पान" हे त्यांचे एक मोठ्ठे चरित्रपुस्तक मात्र लगेचच परत करावे लागल्याने वाचायचे राहून गेले. पुढे काही दिवसांनंतर मी एक पोष्टकार्ड आणले, "आदरणीय महोदय, मला आपले चरित्र वाचावयाचे आहे, परंतु पुण्यात पुस्तक उपलब्ध नाही. आपण मला पुस्तक पाठविले तर बरे होईल."असा मजकूर लिहून-  "श्री. यशवंतराव चव्हाण, नवी दिल्ली -१" एवढ्याच पत्त्यावर पत्र पाठव...

कामगार क्षेत्रातील तळपता तारा : कॉ. दादा रुपमय तथा आर.एम. चटर्जी स्मृतिदिन. [© लेखक : अरुण तुकाराम बोऱ्हाडे]

Image
निःस्वार्थी, नितळ मनाचे आणि लढाऊ बाण्याचे थोर कामगार नेते, दिवंगत कॉम्रेड  रूपमय तथा आर. एम. दादा  चटर्जी यांचा आज स्मृतिदिन.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रीय विचार आणि कार्याशी बांधिलकी मानून कामगार क्षेत्रामध्ये "त्याग, तपस्या, बलिदान" हे ब्रीद वाक्य अंगिकारून,  "टी.यू.सी.सी." म्हणजेच "ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर" ही राष्ट्रीय मान्यता प्राप्त कामगार संघटना कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध कामगार संघटनेत कार्यरत असणाऱ्या सर्वांना याविषयी माहिती आहे. विशेषतः कॉ. दादा रुपमय तथा आर.एम. चटर्जी यांनी यासाठी दिलेले योगदान सर्वश्रृत आहे. मी कामगार चळवळीत काम करण्यासाठी जी काही कारणे असतील, त्यामध्ये दादा रूपमय चटर्जी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव हे देखील एक कारण आहे. मी त्याकाळी नव्यानेच पत्रकारितेत काम करीत होतो. पिंपरीतील महिंद्रा सिंटर्ड या कंपनीतील कामगारांचा दीर्घकाळ संप चाललेला होता. मी वृत्तांकनासाठी आवर्जून त्या ठिकाणी जात असे. कॉम्रेड आर. एम.  चटर्जी यांची अनेक भाषणे मी ऐकली. मी समक्ष भेटून त्यांची वृत्तपत्रासाठी मुलाख...

पवित्र, पावन तरिही प्रदुषित इंद्रायणी - अरुण बोऱ्हाडे

Image
  पवित्र, पावन तरिही प्रदुषित इंद्रायणी ! 🌿 अलिकडेच ऐन दिवाळीत वर्तमान पत्रांतून आणि समाजमाध्यमांतून इंद्रायणी नदीतील फेसाळलेल्या, दुर्गंधीयुक्त पाण्याची छायाचित्रे, बातमीपत्रे वाचनात आली. लहानपणापासून मनामध्ये वसलेल्या पवित्र, पावन इंद्रायणीचे हे प्रदुषित रुप काही नव्याने पाहिले असे नाही. कधी काळेकुट्ट तेलमिश्रित पाणी, कधी मैलामिश्रित पाणी, तर कधी असे फेसाळलेले दुर्गंधाने व्यापलेले पाणी आणि इतरवेळी त्या हिरव्या घनदाट जलपर्णीची वसने पांघरलेली प्रदुषित इंद्रायणी हे चित्र आता अधुनमधून प्रत्यक्षात पहायला मिळते. अनेकदा बातम्यांतून ऐकायला आणि छायाचित्रांतून बघायला मिळते. या सर्व परिस्थितीने मन अस्वस्थ होते, कधीकधी काळीज चिरत जाते. पण इंद्रायणीच्या प्रदुषण नियंत्रण अथवा निर्मूलनासाठी कधी कोणी भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही.  माझ्या बालवयापासून घरामध्ये, समाजामध्ये, कीर्तनांतून, प्रवचनांतून इंद्रायणीचे पावित्र्य ऐकिवात आहे. कधी भल्या पहाटे आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जावे आणि इंद्रायणीच्या घाटावर बसावे. त्या घाटावर वारकरी शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी मन लावून मृदुंगा...

एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण - अरुण बोऱ्हाडे

Image
  एच.ए.च्या कामगार लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे (२) श्रमिक साखळी आणि १४ नोव्हेंबरचे लाक्षणिक उपोषण  © अरुण बोऱ्हाडे  दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी सुरु झालेले घंटानाद आंदोलन हळुहळू वाढत गेले. गेले बारा-तेरा दिवस नित्यनेमाने सकाळी, दुपारी आणि सायंकाळी शिफ्टड्युटीप्रमाणे कामगार सहकारी आंदोलन मंडपात येत. सकाळी कंपनी सुरु होण्यापूर्वी काहीवेळ, पुन्हा दुपारी जेवणाच्या सुट्टीत आणि सायंकाळी ४.३० वाजता कंपनीची सर्वसाधारण पाळी सुटल्यानंतर सहा- साडेसहा वाजेपर्यंत सर्वजण घंटानाद करून धरणे मंडपात बसायचे. वृत्तपत्रांतून दररोज येणाऱ्या बातम्या वाचून शहरातील विविध कारखान्यांतील कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार गटागटाने आंदोलनस्थळी येवून आंम्हाला पाठिंबा जाहीर करीत होते. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनांचेही पदाधिकारी येवून पाठिंबा म्हणून आमच्या धरणे आंदोलनात आमच्यासह बसत होते. दररोज कोणीतरी पाठिंबा देणारी भाषणे करायचे. विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी येवून कामगारांच्या मुलाखती घेत, त्यावेळी आजच्या इतके इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्या नव्हत्या आणि पत्रकार प्रत्यक्षात जावून बातम्या करीत असत. पोलिस...

एच. ए. कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे! (१) [लेखक - अरुण बोऱ्हाडे]

Image
एच. ए. कामगारांच्या ऐतिहासिक लढ्याची संस्मरणीय वीस वर्षे! (१)  © अरुण बोऱ्हाडे 🌿 आज १ नोव्हेंबर, बरोबर वीस वर्षे झाली, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीच्या बंद प्रक्रियेविरोधात आम्ही कामगारांचा लढा उभा केला होता. घंटानाद, धरणे  आंदोलन, मानवी साखळी, पथनाट्ये, मोर्चा, उपोषण अशा विविध पद्धतीने, मात्र काम चालू ठेऊन शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन सुरू केले होते. जवळजवळ एक महिन्याचा आमचा कार्यक्रम निश्चित ठरविलेला होता. त्याप्रमाणे पूर्णही केला, त्याहीपुढे जाऊन संभाव्य खाजगीकरणास विरोध दर्शवित पंचेचाळीस दिवस हा घंटानाद चालू होता. कुठेही हिंसक वळण लागणार नाही, याची पुरेपूर दखल घेण्यात आली होती. या आंदोलनात सर्व कामगार बंधू भगिनींचा सहभाग होता. व्यवस्थापनानेही पाठिंबा दिला होता. प्रश्न प्रत्येकाच्या भवितव्याचा होता. त्यामुळे कामगार अधिकारी एकाच छताखाली लढत होते. हळुहळू पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक कामगार संघटना, सामाजिक संस्थांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला होता. साहजिकच आमचे सर्वांचे मनोधैर्य वाढत होते. विशेषतः त्याकाळातील सर्व वृत्तपत्रांनी खूप चांगले सहकार...

हिरव्या बोलीतील कवी पद्मश्री ना. धों. महानोर [लेखक © अरुण बोऱ्हाडे]

Image
अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत : हिरव्या बोलीतील कवी पद्मश्री ना. धों. महानोर लेखक © अरुण बोऱ्हाडे 🌿 आज सकाळी कविवर्य ना. धों. महानोर गेल्याची बातमी वाचली अन् मनात धस्स झाले. नुकतेच माझे "अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत" हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामधे मी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही व्यक्तिरेखा शब्दबद्ध केल्या आहेत. ज्यांच्या काव्यातील मधाळ, हिरव्या, रसरशीत आणि लडिवाळ शब्दांनी लहानपणापासून माझ्या मनावर अधिराज्य केले आहे, असे रानकवी ना. धों. महानोर या प्रज्ञावंताविषयी मी त्यामध्ये लिहिले आहे. हे पुस्तक त्यांना समक्ष भेटून द्यावे, असा माझा विचार होता. मध्यंतरी कळाले की त्यांची प्रकृती बिघडली आहे, इतक्यात भेटता येणार नाही. आता त्यांना बरे वाटल्यावर जाऊन भेटू, असे ठरविले होते. तथापि नियतीने मला ती संधी दिली नाही. महाराष्ट्रातील एका आगळ्या वेगळ्या प्रतिभेचा चिरंजीवी अक्षरझरा, शब्दफुलांशी, लतावेलींशी, काळ्या मातीशी, धनधान्याशी, समाजाच्या सुखदुःखाशी समरस झालेला रानफुलांत रमणारा प्रज्ञावंत कवी, मराठी साहित्यातील एक मानदंड आणि शेतीमातीशी एकरूप झालेला निगर्वी मोठा माणूस आज हरपला आहे....