''गुलामगिरी'' - अरुण बोऱ्हाडे (कवी, कामगार नेते)
गुलामगिरी !
भारतीय राज्यघटनेचा
आम्ही आदर करतो.
तरिही आम्ही कष्टकऱ्यांना
भरदिवसा लूटतो !
लूटारूंच्या टोळ्या आम्ही
राजकारणासाठी वापरतो !
गुलामगिरी विरोधात लढले,
देशभक्त आणि क्रांतिकारक.
मायभूसाठी त्यांनी बलिदान दिले,
हेही आम्हांला ठाऊक आहे.
आता आम्ही स्वतंत्र भारतात
कष्टकऱ्यांची नवी गुलामगिरी आणणार !
नकोत आंम्हा देशभक्त कोणी !
नको आंम्हाला मार्क्सवाद, साम्यवाद,
नको लोकशाही समाजवाद..!
नकोच कोणाचा आदर्शवाद !
आंम्हाला हवाय कोणत्याही
राजकीय नेत्याचा फक्त आशिर्वाद !
मग बघा आम्ही धिंगाणाच घालणार..
रिक्षावाले, पथारीवाले यांना हप्ते ठरविणार.
हमाल, माथाडी, बांधकाम मजूरांची दलाली
आणि सर्वच कष्टकऱ्यांची लूटमार करणार !
मग शहरातील मान्यवर आमची दखल घेतील,
प्रतिष्ठित म्हणून तेच आमची उठबैस करतील !
कष्टकऱ्यांच्या श्रमाचे आणि रक्ताचे
आम्ही सर्वांसमोर शोषण करणार !
आम्ही लोकशाही राज्यात राहूनच,
पुन्हा नवीन गुलामगिरी आणणार !!
...
@ अरुण बोऱ्हाडे ...✍ (१५/०५/२०२०)

Waa..
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDelete